देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 549 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 57 हजार 740 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 13 हजार 543 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख 61 हजार 555 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 60 हजार 470 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 36 लाख 41 हजार 175 रुग्ण कोरोनामुक्त झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 30-Oct-21
