नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “काँग्रेसमुळे मोदीजी शक्तीशाली” असं म्हणत निशाणा साधला आहे. ममता यांनी “काँग्रेसमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा इतकी शक्तीशाली होऊ शकली तसेच काँग्रेसच भाजपासाठी प्रचारक म्हणून काम करत आहे” असं म्हटलं आहे. ममता बॅनर्जी सध्या गोवा दौऱ्यावर असून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
विजय सरदेसाई यांचा पक्ष ‘गोवा फॉरवर्ड पक्षा’सोबत ममता बॅनर्जी यांनी युतीची घोषणीही केली आहे. सरदेसाई आतापर्यंत भाजप सरकारसोबत राहिलेत. काँग्रेससोबत कोणत्याही निवडणुकीत हातमिळवणी करण्याची शक्यता यावेळी ममता बॅनर्जी यांनी फेटाळून लावली. काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्रित करण्याची गरज लक्षात घेण्यात अपयशी ठरलंय असं म्हणतानाच भाजपचा सामना करण्यासाठी सर्व स्थानिक पक्षांना एकत्रित येण्याची गरज त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:37 PM 30-Oct-21
