मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवरूनच सरकारचा बहुतांश राज्यकारभार पाहिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, ते मंत्रालयात जात नाही. ते राज्यकारभार घरातूनच चालवत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतो. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच घरातून काम करण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. त्या वृत्तानुसार घरून काम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मला मंत्रालयात जाऊन पाट्या टाकायला आवडत नाही. मी घरून होईल तेवढे काम करतो. काम कुठूनही करा घरातून करा किंवा मंत्रालयातून करा, जनतेचं काम होणं, त्यांच्या समस्या सुटणं महत्वाचं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:50 PM 01-Nov-21
