रत्नागिरी : तालुक्यातील मावळंगे ते पावस जाणाऱ्या रस्त्यावरील उतारात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. घडली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अपघाताची नोंद पूर्णगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पूजा अजय शिवलकर (४८, रा. भाट्ये खोतवाडी, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा दीर व दुचाकीस्वार अक्षय विजय शिवलकर (२६, रा.भाट्ये खोतवाडी रत्नागिरी) याने पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार मंगळवारी सकाळी अक्षय हा दुचाकीवरुन वहिनी पूजा हिला सोबत घेऊन पावस ते मावळंगे असा जात होता. त्यावेळी तेथील उतारात दुचाकी घसरल्याने पूजा या दुचाकीवरुन खाली रस्त्यावर फेकल्या जाऊन अपघात घडला. या अपघातात पूजा अजय शिवलकर यांना गंभीर दखापत झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार कदम करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:14 PM 04-Nov-21