सर्प दंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

0

लांजा : शेतात काम करत असणाऱ्या शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लांजा तालुक्यात घडली आहे. यामुळे ऐन दिवाळीत या शेतकऱ्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आत्माराम तुकाराम गुरव वर ७५ रा. गोंडेसखलवाडी, ता. लांजा हे शेतात गेले असता त्यांच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ घोणस सापाने दंश केला. प्राथमिक उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय लांजा येथे हलवण्यात आले व त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 06-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here