थंडीची चाहूल; बागायतदारांच्या आशा पल्लवीत

0

रत्नागिरी : यंदाच्या वर्षी आलेली चक्रीवादळे, महापूर यामुळे चिंतेचे वातावरण असतानाच आता नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीची चाहूल लागल्याने आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, मागील तीन दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धाकधूकही वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात घट होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्याचे कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ ते २७ अंश एवढे होते. रविवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान २२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. ग्रामीण भागात नदीकिनारी पहाटेच्या वेळी धुके पडू लागले आहे. सकाळी व सायंकाळी हवेत बऱ्यापैकी गारठा जाणवू लागला आहे. पावसामुळे दिवसभर मळभ असल्याने कडाक्याचे उनही जाणवत नाही. दि. १४ नोव्हेंबरपर्यंत हवामान कोरडे होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने यापुढील दिवसात थंडीचा कडाका वाढणार आहे. जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान चांगले राहिले असले तरी ऑक्टोबर हीटही बऱ्यापैकी जाणवली. मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हवेत फरक जाणवू लागला आहे. हवेत गारवा निर्माण झाल्याने मोहोर वेळेत येण्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून थंडी सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर आंबा, काजू बागायतीमध्ये फुलोऱ्यास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या बागांमधील कलमांना मोहोर लवकर आला तर यावर्षी मार्चपासूनच आंबा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:05 AM 08-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here