सरकारनं समिती नेमल्यानंतरही एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम, सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात एसटी बंद

0

मुंंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी समजण्यात यावे, या मागणीचा विचार करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असली तरी त्यामुळे कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नसून, त्यांचा संप कायमच आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात एसटी बंद असल्याचे चित्र आहे. किंबहुना संपाची व्याप्ती राज्यभरात वाढली असून, सुमारे २४० आगारांतील एसटी कर्मचारी आता संपात उतरले आहेत. त्यामुळे एसटी सेवा पार कोलमडली असून, ग्रामीण भागांतील प्रवाशांचे मात्र हाल सुरू झाले आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेतला तपशील मान्य नसल्याचे म्हणत एसटी कर्मचारी संघटनांनी संपाच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याची माहिती उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. उच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे राज्य सरकारने विशेष समिती स्थापण्याबाबत अधिसूचना काढली. त्यानंतर समितीने तातडीने बैठक घेतली व त्याचे इतिवृत्तही तयार केले आहे, अशी माहिती मुख्य सरकारी वकील पी.ए. काकडे यांनी न्या. एस. जे. काथावाला व न्या.एस.पी. तावडे यांच्या खंडपीठाला दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:15 AM 09-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here