कार्तिकीचा उत्सव होणार पण परगावच्या व्यापाऱ्याना रत्नागिरीत प्रवेश नाही

0

रत्नागिरी : 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा उत्सव आहे. मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कार्तिकीच्या उत्सवावर निर्बंध आले होते. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी कोरोनाचे आवश्यक नियम पाळून धार्मिक पध्दतीने शहरातील विठ्ठल मंदिर येथे कार्तिकीचा उत्सव होणार आहे. मात्र या उत्सवाच्या निमित्ताने परगावातून येणाऱ्या व्यापाऱ्याना बंदी करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली आहे. आज शहर पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी विठ्ठल मंदिर संस्था, शहर व्यापारी महासंघ यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष प्रमोदशेठ रेडीज, राजन फाळके, नगरसेवक राजेश तोडणकर, शेखर पिंपुटकर, प्रवीण हेळेकर व व्यापारी महसंघाच्या वतीने अध्यक्ष गणेश भिंगार्डे, उपाध्यक्ष राजकुमार जैन, हेमंत वणजु, शेखर कवितके, शरद मुळीक, कौस्तुभ दीक्षित आदी उपस्थित होते. या बैठकीत कार्तिकी उत्सवाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली. बाजारपेठेत या दिवशी फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. या दिवशी बाजारपेठेतील कुणीही दुकानदार आपल्या दुकानाबाहेर कुणालाही माल लावू देणार नसल्याचा निर्णय शहर व्यापारी महासंघाने घेतला आहे. परगावातून येणाऱ्या व्यापाऱ्याना शहरात प्रवेश दिला जाणार नसून शहराच्या सीमेवरच्या त्यांना नाकाबंदी करण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:34 PM 09-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here