रत्नागिरी : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय महिलांच्या योगदानाची दखल घेण्यात घेऊन महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘नवदुर्गा’ राज्यस्तरीय पुरस्कार रत्नागिरीतील उद्योग क्षेत्रातील उन्नती राकेश साळवी यांना देण्यात आला. राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान दरवर्षी ८ मार्च या महिला दिनानिमित्त करण्यात येत असतो. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळे या पुरस्कारांचे वितरण ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उन्नती साळवी यांना ‘आदर्श उद्योजिका’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उन्नती साळवी या ब्युटी स्पा व सलून रत्नागिरी असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 10-Nov-21