आंबा घाट येत्या चार दिवसांत पूर्ववत होणार; आ. राजन साळवी यांची माहिती

0

रत्नागिरी : रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट येत्या चार दिवसांत पूर्ववत चालू होणार असल्याची माहिती राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी दिली. कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाटाची मोठी पडझड झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर तात्पुरती स्वरूपात डागडुजी करून छोट्या वाहनांची वाहतूक चालू करण्यात आली होती. परंतु एसटी बस आणि मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करून ती राजापूर तालुक्यातील पाचल-अणुस्कुरा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात आली आहे. मात्र त्यामुळे वाहतूकदारांवर मोठा ताण पडत होता. वेळ आणि इंधनाचा मोठा खर्च होत होता. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, राष्ट्रीय महामार्ग सहायक अभियंता विलास पाटील, कनिष्ठ अभियंता कौशिक रहाटे यांच्याशी आमदार श्री. साळवी यांनी चर्चा केली आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यानुसार येत्या चार दिवसांत आंबा घाट वाहतुकीस सुरू करण्याच्या दृष्टीने काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:28 AM 11-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here