पंतप्रधान मोदी कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन करतात का? माजी केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

0

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रानौत हिनं ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या काही वादग्रस्त टिप्पण्यांमुळे ती पुन्हा एकदा वादात अडकली आहे. कंगना रानौत हिच्या वाचाळ बडबडीमुळे नाराज माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनीही सोशल मीडियावरून प्रतिक्रिया व्यक्त केली. तसंच राष्ट्रपती भवनानं कंगना रानौत हिच्याकडून पद्म पुरस्कार परत घ्यायला हवं, अशी मागणीही त्यांनी केलीय. सन १९४७ मध्ये भारताला भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर मिळालं, असं वादग्रस्त विधान कंगनानं बुधवारी एका कार्यक्रमात केलं होतं. यावर, कंगना रानौत हिचं वक्तव्य निंदनीय आणि धक्कादायक असल्याचं आनंद शर्मा यांनी म्हटलंय. ‘निंदनीय आणि सगळ्या देशाला धक्का देणारं वक्तव्य… सुश्री कंगना रानौत हिचं वक्तव्य महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांसारख्या साहसी स्वातंत्र्यसैनिक आणि सरदार भगत सिंह, चंद्रशेखर आझाद आणि इतर अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाचा अपमान करणारं आहे. माननीय राष्ट्रपतींनी सुश्री रानौत हिला दिलेला पद्म पुरस्कार त्वरीत परत घ्यायला हवा. या पद्धतीनं पुरस्कार देण्यापूर्वी मानसिक क्षमतेचं मूल्यांकन करायला हवं त्यामुळे भविष्यात अशा व्यक्ती राष्ट्र आणि त्यांच्या नायकांचा अपमान करणार नाहीत. पंतप्रधानांनी आपलं मौन सोडायला हवं आणि राष्ट्राला सांगायला हवं की ते सुश्री रानौत यांच्या विचारांचं समर्थन करतात का? जर नसेल, तर सरकारनं अशा लोकांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करायला हवी’ असं दीर्घ ट्विट आनंद शर्मा यांनी केलंय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:05 PM 12-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here