एसटी कर्मचारी २२ नोव्हेंबर पर्यंत संपावर ठाम

0

रत्नागिरी : एस. टी. महामंडळ आणि राज्य सरकार या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या संप प्रकरणी अंतरिम आदेश देत पुढील सुनावणीची तारीख दि. २२ नोव्हेंबर निश्चित केली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी दि.२२ पर्यंत संप सरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपात सहभागी असलेल्या संघटनांनी मंगळवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत आपले लेखी म्हणणे सादर करावे, त्यानंतर समितीच्या बैठकीचे इतिवृत्त राज्य सरकारनं २२ नोव्हेंबरपर्यंत कोर्टात सादर करावे, असा अंतरिम आदेश न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने सोमवारी दिला. त्यामुळे रत्नागिरीतील कर्मचाऱ्यांनी दि.२२ नोव्हेंबरपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात चार हजार २७१ एसटीचे कर्मचारी आहेत. त्यापैकी ६४ कर्मचारी हजर आहेत. जिल्ह्यात केवळ राजापूर आगारातून ३ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. अन्य आगारातून एकही एसटीची फेरी झालेली नाही. दरम्यान, सोमवारी कार्तिकी एकादशी असल्याने रत्नागिरीत होणाऱ्या उत्सवाला तालुक्याच्या ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र, एसटी बंद असल्याने दरवर्षी होणारी गर्दी यंदा पहायला मिळाली नाही. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आडकाठी नाही एसटी महामंडळाचे जे चालक, वाहक काम करण्यासाठी येण्यास स्वतःहन तयार असतील त्यांना कोणतीही आडकाठी नाही, त्यांची सेवा घेऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी बसगाड्या चालवण्याची महामंडळ प्रशासनाला मुभा आहे, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 16-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here