परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेत भरमसाठ चुका झाल्याप्रकरणी संबंधित एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत खुलासा सादर करण्यास मुदत देण्यात आलेली आहे. राज्यात 19 जानेवारी रोजी ‘टीईटी’ घेण्यात आली. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकेका पानात 30-35 शुद्धलेखानाच्या चुका झाल्या आहेत. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात ‘टीईटी’च्या परीक्षेतील चुकांप्रकरणी एजन्सीला राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी नुकतीच नोटीस बजावली आहे.