अतिवृष्टीचा फटका राज्यातील साखर उत्पादनावर

0

दुष्काळ आणि अतिवृष्टीचा मोठा फटका राज्यातील साखर उद्योगाला बसला आहे. महाराष्ट्रात यंदा १५ फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन ४३.३८ लाख टन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत उत्पादन ८२.९८ लाख टन होते. या हंगामात १४३ कारखान्यांपैकी आठ कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. गतवर्षी १९३ साखर कारखाने सुरू होते. यंदा उसाचे प्रमाण कमी असल्यामुळे राज्यात ५० कारखाने बंद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here