जिल्ह्यातील संगणक परिचालकांची दिवाळी कडूच

0

साखरपा : राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ७०० संगणक परिचालकांची यंदाची दिवाळी कडूच झाली. मागील चार महिन्यांचे मानधन परिचालकांना अद्याप मिळालेले नाही. निदान दिवाळीच्या सणाला तरी मानधन मिळेल, अशी अपेक्षा या संगणक परिचालकांना होती. मात्र, ऐन दिवाळी सणालाही मानधन त्यांना मिळाले नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत
आहे. ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना ऑगस्ट महिन्यापासून मागील दोन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना मार्च २०२२ पर्यंतचे सगळे मानधन आगावू वर्ग केले आहे. पण तरीही जिल्हा परिषद आणि संबंधित ठेकेदार कंपनीकडून परिचालकांना मानधन वर्ग करण्यास सातत्याने विलंब होत असतो. दरवेळी सुमारे तीन ते चार महिन्यांचे मानधन थकीत असताना ऐन सणाच्या तोंडावर कंपनी एखाद्या महिन्याचे मानधन देऊन तोंडाला पाने पुसत असते. यंदा तर तेही करण्यात आलेले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत परिचालकांना मानधनापासून वंचित राहावे लागले. कोणतीही नवीन योजना अथवा जुन्या योजनेतील सुधारणा आली की परिचालकांची आठवण प्रशासनाला होते. पण प्रत्येक वेळी मानधन थकीत ठेवले जाते. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 23-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here