राज्यात नवं सरकार आलं की मंत्र्यांच्या घरांचा प्रश्नही गाजत असतो. या घरांच्या नुतनीकरणावर होत असलेल्या उधळपट्टीवरून महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. या सर्व प्रकारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘बंगल्यांवर होणारा खर्च मर्यादित ठेवा, असा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला अजित पवार यांनी दिला आहे. तसेच वास्तुविशारदांनी सुचवलेल्या महागड्या वस्तूंचा खर्च टाळावा, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला अजित पवार यांनी केली.