पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कोरोनामुळे यंदा शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात घट झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील वर्षी पाचवीचा निकाल 24.82 टक्के तर आठवीचा निकाल 15.07 टक्के होता. यावर्षी पाचवी आणि आठवीचा निकाल अनुक्रमे 16.99 आणि 11.39 टक्के लागला आहे. यावर्षीचा पाचवीचा शिष्यवृत्ती निकाल मागील वर्षीच्या तुलनेत 7.83 ने तर आठवीचा निकाल 3.68 ने घटला आहे. कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलावे लागली होती. अखेर ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेस नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 47 हजार 708 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोरोनामुळे परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती.
निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://www.mscepuppss.in/
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:22 PM 24-Nov-21