सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. संसदेच्या अधिवेशनात सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. संसद अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी संसदेचे कामकाज शांतते पार पडेल अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, संसदेत किती तास कामकाज झाले हे महत्त्वाचे आहे. विरोधकांनी सरकारवर, सरकारच्या धोरणांवर टीका करावी, आवाज उठवावा. मात्र सभागृहाच्या, लोकसभा अध्यक्षांच्या प्रतिष्ठेला धक्का बसू नये याचीही काळजी सदस्यांनी घ्यावी असेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. संसदेचे हे सत्र आणि येणारे पुढील सत्र देशाच्या स्वातंत्र्याच्या भावनांच्या अनुरूपाने देशाच्या प्रगतीसाठी खासदारांनी चर्चा करावी. संसदेचे हे सत्र विचारांची समृद्धी दाखवणारा, दूरगामी प्रभाव निर्माण करणारा सकारात्मक निर्णय ठरावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. भारताने 100 कोटी डोस दिल्याचा टप्पा पार केला आहे. आता लवकरच 200 कोटी डोस देण्याचा टप्पा पार करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 29-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here