राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनावर शिवसेना खासदार प्रियांका चर्तुवेदींची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

0

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेससह पाच पक्षांच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. 11 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या 255 व्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. खासदारांनी या निलंबनाचा निषेध केलाय. निलंबन केलेल्या खासदारांमध्ये शिवसेना खासदार प्रियांका चर्तुवेदी आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. निलंबनाच्या कारवाईवर प्रतिक्रिया देत प्रियांका चर्तुवेदी यांनी म्हटलं की, ”निलंबन करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.” प्रियांका चर्तुवेदी यांनी म्हटलं की, ”कोणी आरोपी असतील तर जिल्हा न्यायाधीशांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांची सुनावणी होते. त्यांच्यासाठी वकीलही दिले जातात. काही वेळा सरकारी अधिकाऱ्यांना आरोपींची बाजू जाणून घेण्यासाठी पाठवले जाते. मात्र, इथे आमची बाजूही ऐकून घेतली गेली नाही.’ त्यांनी पुढे सांगितलं की, ‘जर सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर लक्षात येईल की, संसदेत पुरुष मार्शल महिलांसोबत धक्काबुक्की करत होते. निलंबनाचा निर्णय एकतर्फी आहे. हे असंसदीय वर्तन आहे” असं त्यांनी म्हटल आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:17 PM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here