शेतकरी आंदोलन: ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नाही, नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही’ : कृषीमंत्री नरेंद्र तोमर

0

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दोन्ही सभागृहात तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवातही जोरदार गदारोळात झाली. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेच्या 12 खासदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे. हे निलंबन रद्द करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. निलंबित खासदारांनी माफी मागावी, असं सभापतींनी बोलले असले तरी विरोधक त्यासाठी तयार नाहीत. दरम्यान, कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा मृत्यू आणि नुकसान भरपाईबाबत सरकारने मंगळवारी संसदेत प्रतिक्रिया दिली. सरकारकडे असा काही डेटा आहे का, ज्यामध्ये पीडित कुटुंबांचा उल्लेख असेल किंवा त्यांना मदत करण्याचा काही प्रस्ताव असेल ? असा प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला होता. यावर कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की, कृषी मंत्रालयाकडे मृत्यूची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:25 PM 01-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here