रत्नागिरी : मागील दोन वर्षात कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत अनेकांनी आरोग्य सेवेत नोकऱ्या केल्या. मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी होताच या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तर अनेकांचे मागील चार महिन्यांचे पगार देखील झालेले नाहीत. सध्या बेकार असणाऱ्या या कर्मचाऱ्यांसमोर आता आर्थिक संकटे उभी राहिली असून काही बँकांनी कर्जाजे हप्ते फेडण्यासाठी तगादा लावला आहे. रात्री अपरात्री फोन करून या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यापर्यंत काही बँकांची मजल गेली आहे. आम्ही दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहोत, मिळताच आम्ही कर्जाचे हप्ते फेडू मात्र तोपर्यंत तरी तगादा लावू नये अशी लेखी मागणी देखील काही कर्मचाऱ्यांनी बँकेकडे केली आहेत. या कर्मचाऱ्यांची अडचण ओळखून बँकांनी देखील सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:47 PM 02-Dec-21