खालगाव तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी उल्हास मुळ्ये यांची निवड

0

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी खालगाव या गावातील विकास कामांचा कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या उल्हास भार्गव मुळ्ये यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. उल्हास मुळ्ये हे गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गावातील वाडीवस्तीतील सर्व स्तरातील विकास कामांना प्राधान्य देत विकास कामांचा पाठपुरावा करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात .त्यांच्या पुढाकाराने खालगावात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत.तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दोन वर्षांपूर्वी ते याच अध्यक्ष पदावर कार्यरत होते. तद्नंतर माजी सैनिक मधुकर रामगडे यांची सलग दोन वर्षे अध्यक्ष पदावर निवड झाली होती. त्यानंतर यावर्षी पुन्हा सामाजिक कार्यकर्ते उल्हास मुळ्ये यांची तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून माजी सैनिक मधुकर रामगडे तर सचिव म्हणून गावचे पोलीस पाटील प्रकाश जाधव हे काम पाहत आहेत. गावात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी गावापातळीवरच तंटे सामंजस्याने मिटवण्यावर आपला अधिक भर राहील,असा आशावाद उल्हास मुळ्ये यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. मुळये यांच्या अध्यक्ष निवडीबद्दल गावातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:33 PM 03-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here