पुणे : पुणे महानगरपालिकेजवळ भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजपच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. संपूर्ण शहरातून कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करत कार्यक्रमासही आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक, विरोधी पक्षांवर टीका, याबाबरोबरच मोदींचे कौतुक अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चालला आहे. तर महाराष्ट्र सरकार वसुली करण्यात गुंग झाले आहेत. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर वसुली सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि कार्यकर्तेच खंडणी वसूल करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
मोदींच्या नेतृत्वाखाली वॅक्सिन तयार झाले नसते तर काय झाले असते? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, मोदींनी सर्व वैज्ञानिकांना सोबत घेऊन, कंपन्यांना ऍडवान्समध्ये पैसे दिले. आणि वॅक्सिन तयार केली. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आम्ही इतके डोस दिले म्हणून सांगत होते, पण हे सर्व डोस त्यांना मोदींनी दिले असल्याचे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:27 PM 04-Dec-21