पीएम किसान योजनेचे पैसे परत करू नयेत : जाकीर शेकासन

0

आरवली : प्रधानमंत्री किसान योजनेचे अनुदान रक्कम परत जमा करण्याचे आदेश तहसीलदारांमार्फत राज्य शासन काढत आहे. केंद्र शासनाला बदनाम करण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा असून कोणीही रक्कम परत करु नये, असे आवाहन शेतकऱ्यांना भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केले आहे. पीएम-किसान योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ते थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, अचानक राज्य शासनाने काही शेतकऱ्यांना आपण या योजनेसाठी पात्र नाही असे कळवून जमा झालेली अनुदानाची रक्कम परत करण्याच्या नोटिसा पाठवून सूचना केल्या आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केले. तेव्हा राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना या अर्जाची छाननी करताना हे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत ते का कळले नाही? आता शेतकऱ्यांनी
रक्कम खर्च केली. त्यामुळे गरीब शेतकरी ही रक्कम कशी परत करणार? असा सवाल शेखासन यांनी उपस्थित केला आहे. अद्याप राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, वादळात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नसताना पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे परत मागण्यामागे राज्य शासनाला मोदी सरकारला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप करुन शेकासन यांनी शेतकऱ्यांना हे अनुदानाचे पैसे परत करू नका, असे आवाहन शेकासन यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:38 PM 09-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here