एसटी संप : कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याची आज शेवटची संधी

0

मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी सोमवारी शेवटची संधी आहे. आतापर्यंत महामंडळाने तब्बल १० हजार १८० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. रोजंदारीवरील दोन हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे. दोन हजार २५० जणांची बदली केली आहे. वेतनवाढ देऊनही कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. चर्चेची दारे सरकारने खुली ठेवली आहेत. मात्र संपकऱ्यांकडून कोणताही ठोस प्रस्ताव सरकारकडे जात नसल्याने कोंडी फुटलेली दिसत नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:05 AM 13-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here