रत्नागिरी : महिना उलटून गेला तरी एसटी कर्मचारी विशेषतः चालक-वाहक हजर होण्याची संख्या अत्यल्प आहे. आतापर्यंत केवळ ५९४ कर्मचारी हजर झाले आहे. संप मागे घेण्याची कोणताही निर्णय झालेला नसून २० डिसेंबरनंतरच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. गेल्या तीन चार दिवसापासून दररोज ४९ बसेस जिल्हयात सुरु आहेत. एसटी कर्मचारी संप मागे घेत नसले तरी आता खासगी वाहतुकीच्या मदतीने नागरिकांनी आपले दैनंदिन कामकाज सुरु केले आहे. शाळा कॉलेजही सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता प्रवाशांचा लाल परीवर विश्वास असला तरी कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे निराशा निर्माण झाली आहे. सोमवारी हजर होण्यासाठी निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना मुदत देण्यात आली होती. मात्र, २१६ निलंबनापैकी केवळ १ कर्मचारी हजर झाला त्यामुळे प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य कर्मचाऱ्यांचे मिळाले नाही. सोमवारी कामावर हजर झाल्यास निलंबन मागे घेण्यात येणार होते. मात्र, एकच कर्मचारी हजर झाला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:41 AM 15-Dec-21