चिपळूण : महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटना पुणेची बैठक औरंगाबाद येथे झाली. यावेळी नूतन राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड केली असून राज्य उपाध्यक्षपदी चिपळूणचे मनोज गांधी यांची नियुक्ती केली. यामध्ये संजय पाटील (सोलापूर), हरिभाऊ कातोरे (औरंगाबाद), तर विक्रांत परमार (अमरावती), मनोज गांधी (चिपळूण), बाळासाहेब पाटील (कोल्हापूर), गुलाब शिंदे (लातूर), विजय पत्रे (नागपूर) यांचा समावेश आहे. सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी औरंगाबाद विभागातील निवृत्ती जोरी, बाळासाहेब निकम, हरिभाऊ कातोरे, प्रवीण डावखरे, संतोष लाळगे, शामराव पाटील, राधाकृष्ण पाटील, अशोक पठाडे, अर्जुन चव्हाण आदींनी सभेचे नियोजन करून निवडणूक प्रक्रिया पार पाडली. दरम्यान, मनोज गांधी यांची निवड झाल्याबद्दल चिपळूण परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:24 PM 16-Dec-21