चिपळूण : वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पाचवे पर्यावरण संमेलन राळेगणसिद्धी येथे दि. २५ व २६ डिसेंबरला होत आहे. या संमेलनात कोकणातील पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. शनिवार २५ रोजी स. १० वाजता संमेलनाध्यक्ष पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री धिवरे यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता संमेलनाची नावनोंदणी सुरु होईल. उद्घाटन कार्यक्रमात पर्यावरण मंडळाच्या वेबसाईटचे उद्घाटन होईल. वेबसाईटचे संपादन मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी केले आहे. दपारी २ ते ३ वा. वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांचे ‘पाणी व जलव्यवस्थापन’, ३ ते ४ वा. प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांचे ‘सौरऊर्जा व्यवस्थापन’, सायंकाळी ४.१५ ते ५.१५ वा. स्वच्छ भारत मिशनच्या प्रभाकर तावरे यांचे ‘प्लास्टिक निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापन’, ५.१५ ते ५.४५ वा. पक्षिमित्र अनिल माळी यांचे ‘महाराष्ट्रातील पक्षी विविधता आणि अधिवास संवर्धन’, ५.४५ ते ७ वा. पर्यावरण कार्यकर्त्यांचे अनुभव कथन,७ते ७.३० वा. अमेरिकतील पर्यावरण अभ्यासक संगीता तोडमल यांचे ऑनलाईन पद्धतीने ‘पर्यावरणाचे वेगळेपण’ आदी विषयांवर व्याख्यान होणार आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी सकाळी ८ ते १०.४५ वा. ‘राळेगणसिद्धी’ क्षेत्रभेट होईल. ११ ते १२.३० अण्णा हजारे यांच्यासोबत संमलेन प्रतिनिधींचे विचारमंथन आणि चर्चा होईल. दु. १२.३० ते १ वा. जगात कोठेही उपलब्ध नसलेल्या पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे ‘देशी बियाणे बँक’ यावर मार्गदर्शन होईल. २ ते ४ वा. संमेलनाध्यक्ष अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ होईल. संमेलनाला येणाऱ्यांचे ‘कोरोना’चे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:06 PM 18-Dec-21