पनामा पेपर्स लीक प्रकरण: अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला ईडीचे समन्स

0

नवी दिल्ली : पनामा पेपर लीक प्रकरणात अभिनेत्रा ऐश्वर्या राय बच्चन हिच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला समन्स बजावले आहेत. त्यामुळे आता ऐश्वर्याला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर रहावं लागणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील ऐश्वर्याला याप्रकरणी दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, दोन्ही वेळा ऐश्वर्याने ही नोटीस स्थगित करण्याची मागणी केली होती. परंतु, आता पुन्हा तिसऱ्यांदा तिला चौकशीचे समन्स बजावण्यात आले आहेत. पनामा पेपर लीक प्रकरणात एका कंपनीतून काही कायदेशीर कागदपत्र लीक झाले होते. यामध्ये जवळपास ४२४ भारतीय व्यक्तींचे विदेशी बँकांमध्ये खाते असल्याचं उघड झालं होतं. यात राजकीय नेत्यांपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा समावेश होता. विशेष म्हणजे यात ऐश्वर्या रायसह अमिताभ बच्चन, अजय देवगण या कलाकारांच्या नावाचाही समावेश आहे.

दरम्यान, सध्या पनामा पेपर लीक प्रकरण सर्वोच्च न्यायालायपर्यंत पोहोचलं असून केंद्र सरकारने या प्रकरणी मल्टी एजन्सी ग्रुपची समिती नेमली आहे. या समितीमध्ये CBDT, RBI, ED आणि FIU यांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:42 AM 20-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here