‘जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांची संमती’ : राजा काजवे

0

राजापूर : ‘तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेने जैतापूर प्रकल्प विरोधाचे ढोल बढवायला सरुवात केली आहे. मात्र, ज्या पाच गावांतील स्थानिक प्रकल्पग्रस्त जनतेने मोबदला स्वीकारला आहे त्या जनतेला प्रकल्प हवा आहे. यातून त्यांनी प्रकल्पाला संमती दिल्याचेच पुढे आले आहे. त्यामुळे शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध हा राजकीय स्वार्थासाठी असून शिवसेनेने ही नौटंकी आता बंद करावी’, असा टोला भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजा काजवे यांनी लगावला आहे. जर ९८ टक्के प्रकल्प ग्रस्त मोबदला स्वीकारत असतील तर मग विरोध कोणाचा, असा खडा सवाल उपस्थित करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला फसविण्याचे धंदे आता शिवसेनेने बंद करावेत, असा घणाघातही काजवे यांनी केला आहे. प्रस्तावित जैतापूर प्रकल्प विरोधी आंदोलनाच्या लढ्यात कायमच अग्रभागी असलेले व तुरुंगवास भोगलेल्या राजा काजवे यांनी विकासाच्या मद्यावर जैतापर अणुऊर्जा व रिफायनरीचे समर्थन करत शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये आले आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या या प्रकल्पविरोधी बेगडी भूमिकेवर तोफ डागली आहे. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्पग्रस्तांना वाढीव मदत जाहीर केली आणि मग प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला स्वीकारण्यासाठी शासनदरबारी रांगा लागल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:18 PM 20-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here