रविवार दि. २३ रोजी झालेल्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत संघटना वाढीसाठी दिशा ठरवण्यात आली. तसेच ना. उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजीवर भाष्य केलं. आमदार भास्कर जाधव जर नाराज असतील तर मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन नाराजी दूर करेन. मुख्यमंत्री येणार त्या दिवशी हेलिपॅडजवळ स्वागतासाठी आलेल्या आमदार जाधवांचे स्वागत मी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून केले, असेही सामंत यांनी सांगितले.