फडणवीसांच्या मनात ‘ती’ सल असल्यामुळेच मला माफी मागायला लावली : भास्कर जाधव

0

मुंबई : गेल्या अधिवेशनात मी तालिका अध्यक्ष असताना भाजपचे १२ आमदार निलंबित झाले होते. त्याची सल भाजपच्या मनात अजूनही आहे. माझ्याविरुद्ध त्यांना काहीच कारण मिळत नव्हते. त्यामुळे आज माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी पंतप्रधानांचा अपमान केला, असे वातावरण निर्माण करण्यात आले आणि मला माफी मागायला लावण्यात आली, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले.

आजचा प्रसंग पाहता मी १२ आमदारांना निलंबित केल्याची सल भाजपच्या मनात कायम आहे, हे स्पष्ट झाल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले. देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, हे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नसताना केले असे सांगून देवेंद्र फडणवीस हे शब्दच्छल करु पाहत होते. त्यामुळे मीदेखील तेच केले. नरेंद्र मोदी यांनी ते वक्तव्य पंतप्रधान होण्यापूर्वी केले होते. त्यामुळे मी पंतप्रधान नव्हे तर भाजपच्या उमेदवाराची नक्कल केली, असा शब्दच्छल मी केला. भाजपने केलं तर सगळं चालतं, पण इतरांनी केलं तर चालत नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

या सगळ्या वादानंतर माझ्या पक्षातील वरिष्ठांनीही मला माघार घेण्याचा सल्ला दिला. माफी मागण्याने माणूस लहान होत नाही. त्यामुळे मी सभागृहात माफी मागितल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना माझ्याविरोधात हक्कभंग आणायचा असेल तर तो त्यांनी जरुर आणावा. मी त्याला सामोरा जायला तयार आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:05 PM 22-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here