रेल्वे प्रवासादरम्यान महिलेच्या हातातील बॅग लांबवली, 5 लाखांचा मुद्देमाल लंपास

0

रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेच्या हातातली बॅग लांबवून सुमारे ५ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ७ डिसेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजण्याचा सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रमीला प्रभाकर तळेकर (६०, रा. फोंडाघाट गडगे-सखलवाडी, कणकवली) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रमिला या वसई ते कणकवली असा रेल्वेतून प्रवास करत होत्या. ७ डिसेंबरला पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबण्यासाठी स्लो झाली असता अज्ञात प्रमीला यांच्या सीटच्या शेजारी येऊन उभा राहिला व त्याच संधीचा फायदा घेत प्रमिला यांच्या हातातील लाल रंगाची बॅग जबरदस्तीने खेचून रेल्वेतून उडी मारून पळून गेला. बॅगमध्ये १ लाख ७० हजार रुपयांचे ४ तोळे वजनाचे ३ पदरी मंगळसूत्र व सोन्याची साखळी, तीन अंगठ्या, सोन्याची चेन, हार, कुड्या, झुमके, नथ आणि रोख ९ हजार रुपये असा एकूण ५ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

प्रमिला यांनी या बाबत कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या नंतर २१ डिसेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 24-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here