मुंबई : महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या ३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याविषयी सरकार सकारात्मक आहे. आत्महत्या कशामुळे झाल्या, याविषयी माहिती घेतली जात आहे. ज्या एसटी कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांना ५ लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिली.
एसटी संपाच्या वेळी ३६ कर्मचार्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या वारसदारांना नोकरी देणार का ? असा प्रश्न सदस्या श्वेता महाले, मेघना चाकोरे आदी सदस्यांनी प्रश्नोत्तरात विचारला होता. त्या वेळी ते बोलत होते.
परब पुढे म्हणाले की, एसटी महामंडळ कामगारांविषयी सहानुभूतीने विचार करत आहे. कर्मचार्यांच्या थेट वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर राज्यांमध्ये जसे पगार आहेत, त्याच्या तोडीचे काहींपेक्षा अधिक वेतन कर्मचार्यांना देण्यात आले आहे. तरीही कर्मचारी विलिनीकरणाविषयी अडून आहेत. काही कामगार कामावर आले आहेत, काही आलेले नाहीत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:23 PM 24-Dec-21