आमदार नीतेश राणे, गोटय़ा सावंत यांना अटक करा : आमदार वैभव नाईक

0

कणकवली शहरात संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याला आठवडा उलटत आला तरी अद्यापही पोलिसांनी या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर केलेले नाही. जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर कुणा केंद्रीय मंत्र्यांच्या दबावापोटी पोलीस मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर करण्यास टाळाटाळ करत असतील तर शिवसेना कदापि शांत बसणार नाही.

पुढील दोन-तीन दिवसांत संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराचे नाव पोलिसांनी उघड केले नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल, शनिवारी कणकवली पोलीस ठाण्यामध्ये आमदार नीतेश राणे व गोटय़ा सावंत या दोघांचीही दोन-तीन तास कसून चौकशी करण्यात आली. याचाच अर्थ पोलिसांनी संतोष परब हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार ओळखले आहेत. त्यामुळे केवळ चौकशीचा फार्स न करता आमदार नीतेश राणे व गोटय़ा सावंत या दोघांनाही तत्काळ अटक करावी, अशी मागणी वैभव नाईक यांनी आज केली.

संतोष परब हल्लाप्रकरणी घटनेदिवशीच पोलिसांनी चार हल्लेखोरांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी हल्ल्याची कबुली दिल्याचीही माहिती आहे. त्यानंतर आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. या सर्व आरोपींचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. जिह्यातील कोणत्या नेत्याचे पुण्यात मॉल व बाकीचे व्यवसाय आहेत हे जनतेला माहीत आहे.काल कणकवली पोलीस स्टेशनमध्ये आमदार नीतेश राणे व गोटय़ा सावंत या दोघांचीही दोन-तीन तास कसून चौकशी करण्यात आली. याचाच अर्थ पोलिसांनी मुख्य सूत्रधार ओळखले आहेत. फक्त जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर नाव उघड करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत, असे नाईक म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:15 PM 27-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here