चिपळूण पूरमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक; खा. विनायक राऊत यांचे बचाव समितीला आश्वासन

0

चिपळूण : चिपळुणातील पूरप्रश्नी लवकरच मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन बैठकीचे नियोजन केले जाईल. यावेळी विविध खात्याचे मंत्री अधिकारी यांच्यासह बचाव समितीलाही बोलविले जाईल आणि या बाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी चिपळूण बचाव समितीला दिले आहे.

चिपळुणात गेल्या काही दिवसांपासून वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काढावा व चिपळूण पूरमुक्त करावे यासाठी उपोषण सुरू आहे. प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला राजकीय पक्षांबरोबरच नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर खा. विनायक राऊत यांनी उपोषणस्थळी भेट दिली व बचाव समितीचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी खा. राऊत यांच्यासह माजी खा. हुसेन दलवाई, बचाव समितीचे अरुण भोजने, राम रेडीज, सतीश कदम, शिरीष काटकर, किशोर रेडीज, राजेश वाजे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:10 AM 30-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here