रत्नागिरी : येथील टीआरपी आदिनाथ नगरमध्ये ए. बी. सी. डी. या चार बिल्डिंगचे काम पूर्ण होऊन गेल्या दोन वर्षांपासून सोसायटीचा वापर सुरू आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या एसटीपी प्लान्ट अद्यापही अर्धवट स्थितीत असल्याने या ठिकाणी दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी हे काम पूर्ण होईपर्यंत उर्वरित नवीन इमारतीच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याची नोटीस प्रांताधिकारी यांनी अरीहंत कन्स्ट्रक्शन यांना दिली आहे.
नोटीसनंतरही काम सुरू असल्याने आदिनाथ नगर सोसायटीच्या रहिवाशांनी बुधवारी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. मुळात नवीन इमारत बांधकामाला स्थगिती दिल्याची ऑर्डर दि.२ डिसेंबर २०२१ रोजी प्रांताधिकारी यांनी काढली आहे. असे असतानाही ए. बी.सी.डी. व्यतिरिक्त उर्वरित नवीन इमारतीचे काम बिल्डरकडून सुरू असल्याची बाब राहिवाशांच्या निदर्शनास आली आहे. या बाबत पुन्हा प्रांताधिकारी यांची भेट घेऊन यावर कार्यवाही करण्याची मागणी आदिनाथ सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 30-Dec-21