20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करणार – राज्यसरकार

0

20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या 305 शाळा बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय शासनाच्या या निर्णयाला शिक्षण संघटनांनी विरोध करणं सुरु केलं आहे. 20 हून कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करुन या शाळेतील विद्यार्थ्यांची व्यवस्था जवळच्या इतर शाळेमध्ये करण्यात येणार आहे. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा चावलणं शक्य नसल्याचं सांगत शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळा नफा तोटा कमवण्याचे साधन आहेत काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here