ब्रेकिंग: बावनदी पुलावर ट्रकची 4 गाड्यांना ठोकर; महामार्ग ठप्प

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलावर चार वाहनांमध्ये विचित्र भीषण अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीविहानी झाली नसून, एका ट्रक ने चार गाड्यांना ठोकर दिल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र एक ट्रक पुलावर लटकलेल्या अवस्थेत आहेत. तो पुर्ण मार्गावर आडवा असल्याने दोन्ही बाजूची वाहतुक गेली तीन तास ठप्प आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी क्रेन मागवून वाहने बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:41 AM 01-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here