रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून कोकणात अचानक पारा चढल्याने उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासूनच तापमान वाढत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी पारा कमालीचा चढून ३७ अंश सेल्सिअसवर आला होता. त्यामुळे अक्षरशः उन्हाच्या झळा बसत होत्या.