राजापूर : अर्जुना नदीवर गोठणेदोनिवडे आणि आंगले गावांना जोडणारा पूल मार्गी लागला असून त्यामुळे होडीतून कराव्या लागणार्या धोकादायक प्रवासातून लोकांची आता सुटका झाली आहे.
या पुलासाठी पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि त्याला स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दिलेली साथ निश्चितच कौतुकास्पद आहे, अशा शब्दामध्ये आमदार राजन साळवी यांनी कौतुक केले. पंचक्रोशीतील विकासासाठी भविष्यामध्ये निधी कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी आश्वासित केले. यावेळी त्यांच्या हस्ते फित कापून गोठणेदोनिवडे-आंगले या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.
आ. राजन साळवी पुढे म्हणाले की, पुलाअभावी लोकांना होडीतून धोकादायक प्रवास करावा लागत होता. मात्र, पंचक्रोशी ग्रामविकास समितीने आपल्याशी संपर्क साधल्यानंतर शासनाकडे आपण केलेल्या प्रयत्नातून नाबार्ड योजनेतून 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. त्या निधीतून पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठी शिवसैनिक आणि पदाधिकार्यांचेही लाभलेले सहकार्य कौतुकास्पद आहे. या पुलाच्या उभारणीमध्ये कै. मधुकर भोसले यांचे योगदान असल्याने कायदेशीर तरतूदी पाहून त्यांचे नाव देण्याचा निश्चितच प्रयत्न करू. ओणी येथील सुपर मल्टीस्पशालीस्ट हॉस्पिटलच्या इमारतीसह यंत्रसामुग्रीसाठी सुमारे दिडशे कोटी रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक निधीला लवकरच मंजूरी मिळून हॉस्पिटलच्या कामाचा शुभारंभ होईल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:02 PM 10-Jan-22