ग्रामीण संस्थांना जिल्हा उत्कृष्ट मंडळ पुरस्कारासाठी 17 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

रत्नागिरी : “भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र, रत्नागिरी यांच्यावतीने जिल्हयातील ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या ग्रामीण संस्थांना जिल्हा उत्कृष्ट मंडळ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ग्रामीण क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या युवा मंडळ, महिला मंडळ यांचे व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर, साक्षरता अभियान, सामाजिक चळवळ, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम, कुटुंब कल्याण, गरिबी निवारण कार्यक्रम, पर्यावरण, पिण्याचे पाणी, श्रमदान, ग्रामीण विकास योजना याद्वारे ग्रामीण विकास प्रकियेत आपले योगदान असावे, अशा युवक मंडळे, महिला संस्थांना जिल्हा पुरस्कार रोख रूपये 25 हजार रूपये आहे.

जिल्हास्तरावर निवड झालेल्या मंडळांची शिफारस राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. राज्य पुरस्काराचे स्वरूप रूपये एक लाख आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार रूपये दोन लाख, तीन लाख व पाच लाख असे आहे.

मंडळाचे कार्य हे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीतील असावे.

कार्यक्रम राबविण्यास सलग्न मंडळ, संस्थांनी प्रत्यक्ष कार्याचा फोटो, वर्तमानपत्रे, कात्रणे, प्रमाणपत्र, मागील वर्षाचा लेखापरिक्षण, मंडळ नोंदणी प्रमाणपत्र यांच्यासह विहित नमुन्यातील अर्ज 17 जानेवारी 2022 पर्यंत नेहरू युवा केंद्र, रत्नागिरी येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, रत्नागिरी यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 10-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here