साखरपा : साखरप्यात रविवारी दि. ९ जानेवारी रोजी आठवडा बाजार जोरात सुरू होता. शेवटचा आठवडा बाजार असल्यामुळे लोकांची गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. त्यानुसार तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यापासून आठवडा बाजार बंद होणार आहेत. साखरपा आठवडा बाजारात कोल्हापूरसह स्थानिक व्यापारी आले होते. तसेच साखरपा परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:39 AM 11-Jan-22