रत्नागिरी: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे २५ वे वार्षिक स्नेहसंमेलन आजपासून सुरू होत आहे. ही संकल्पना तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी सुरु केली होती. १९९२ ला याची सुरवात झाली. स्नेहसंमेलन साजरे करण्यासाठी जिल्हा परिषदेत कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात आली. याचे उद्घाटन आज अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते होणार आहे. हे स्नेहसंमेलन १ मार्चपर्यंत चालणार आहे.