‘मुंबई-गोवा महामार्गा’साठी आमदार, खासदार आंदोलन करणार

0

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आदेशाची ठेकेदाराकडून अंमलबजावणी होत नसल्याने त्यांच्यावर पोलिसांमार्फत कारवाई करावी. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी खासदार, पालकमंत्री, आमदार पुढील आठवड्यात कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खा. विनायक राऊत म्हणाले, जनतेच्या हिताचा प्रश्न विचारात घेऊन कोणीही ठेकेदाराला पाठिशी घालू नये. पेढे-परशुराम ते आरवली, आरवली ते तळेकांटे, तळेकांटे ते वाकेड या रस्त्याचे प्रत्यक्ष चौपदरीकरणाचे काम अद्यापही बंदच आहे. काही ठेकेदारांनी काम न करताच ३५० कोटी रुपये घेतले आहेत. ठेकेदार बदलले तरीही महामार्ग चौपदरीकरणाला अद्यापही मुहर्त मिळत नसल्याने आंदोलन हा एकमेव पर्याय असल्याचे खा. विनायक राऊत यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 14-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here