रत्नागिरी : कोरोना निर्बंध काळात ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक ठरवताना शाळा, महाविद्यालयांना सोमवार वगळावा लागणार आहे. देखभाल दुरुस्तीसाठी महावितरणकडून सोमवारी वीजपुरवठा बंद ठेवला जातो. त्यामुळे सोमवारची परीक्षा ठेऊ नये, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
रत्नागिरीतील काही शाळा, महाविद्यालयांच्या ऑनलाईन परीक्षांचा पेपर सोमवारी ठेवण्यात आला होता. परंतु या दिवशी देखभाल दुरुस्तीसाठी शटडाऊन असल्याने वीजपुरवठा काही ठिकाणी बंद होता. त्याचबरोबर विजेचा पुरवठा मध्येच खंडितही होत होता. त्यामुळे ही परीक्षा देताना विद्यार्थ्यांची आणि पालकांची तारांबळ उडाली.
कोरोना काळात शाळा, महाविद्यालय बंद असतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांची शिक्षणपद्धती ऑनलाईनच झाली आहे. अशावेळी परीक्षाच नव्हे, तर इतर शिकवणी वेळीही विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्राध्यापकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे सोमवारचे शिक्षण विद्यार्थी, पालकांना, शिक्षक वर्गाला धोक्याचे ठरत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 14-Jan-22