रत्नागिरी : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोना बाधित रुग्णसंख्येने दोनशेचा टप्पा पार केला आहे. 24 तासात 2 हजार 76 अहवालांमध्ये तब्बल 235 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 960 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 140 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 77 हजार 294 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.66 टक्के आहे. नव्याने 235 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 80 हजार 801 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 762 तर संस्थात्मक विलगीकरणात 198 रुग्ण उपचार घेत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:04 PM 14-Jan-22