विराटने कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहितने धक्कादायक म्हणत अवघ्या दोन वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

0

विराट कोहलीने आपल्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. विराट आणि बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातही सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहितने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. पण अखेर रविवारी त्याने सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या.

विराट कोहलीचा हा निर्णय क्रिकेट विश्वाला हादरवणारा होता. या निर्णयानंतर अनेकांनी ट्विटरवरून आपल्या भावना आणि मतं व्यक्त केली. सलामीवीर रोहित शर्माने मात्र ट्विटर ऐवजी इन्स्टाग्रामवरून विराटच्या या निर्णयाबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

रोहितने विराटसोबतचा स्वत:चा कसोटी क्रिकेट सामन्यातील एक फोटो पोस्ट केला आणि अवघ्या दोन ते तीन वाक्यात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा अतिशय धक्कादायक असल्याचं रोहित शर्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. “विराटचा हा निर्णय धक्कादायक आहे. त्याने संघाचे नेतृत्व करताना जे यश संपादन केलं त्यासाठी त्याचे मनापासून अभिनंदन! भविष्यातील योजनांसाठी शुभेच्छा व सदिच्छा”, अशी इन्स्टाग्राम पोस्ट रोहितने केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:56 PM 17-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here