रत्नागिरी : गेल्या दोन आठवड्यापासून रुग्ण संख्या वाढत आसल्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. मात्र, ७० ते ८० टक्के रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले जात आहे, आताच्या रुग्णांमध्ये सर्दी, तापाचे रुग्ण अक अधिक असून ४ ते ५ दिवसात रुग्ण औषध उपचाराने बरे होतात. त्यामुळे शासनाच्या आयसोल मार्गदर्शन सूचनांनुसार घरीच ‘होम आयसोलेशन’ करण्यावर अधिक भर असून आता ७५ ते ८० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
सध्याच्या कोरोना लाटेत पसार मोठ्या प्रमाणात होत असला तरी मृत्यूदर संपूर्ण देशात कमी आहे. रत्नागिरीत तर अतिशय अल्प प्रमाण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
घाबरून जाऊ नका, मात्र, वेळीच योग्य ती खबरदारी आणि काळजी घेणे गरजेचे आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:28 PM 17-Jan-22