चिपळूण : चिपळूण तालुक्यामध्ये २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये तिवरे-गंगेचीवाडी येथील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. शेती, घरे, नळपाणी योजना आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यापूर्वी पावसाळ्यात या भागाची आ. शेखर निकम यांनी पाहणी केली. मात्र, पुन्हा गंगेचीवाडी स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई, पुणे चाकरमानी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच आ. निकम यांनी बैठक घेतली व ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा केली.
यावेळी स्वप्नील शिंदे, दिनेश शिंदे, सरपंच गजानन साळवी, काशिराम पवार, लक्ष्मण पवार, आबा शिंदे, भालचंद्र पाचांगने, रवींद्र म्हादळेकर, सुरेश कदम, दत्ताराम पाचांगने, तलाठी मेंगे, सर्कल अहिरे, कृषी अधिकारी सचिन पवार, जलसंधारणाचे शेट्ये तसेच तिवरे गावातील महिलांची उपस्थिती होती.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:04 PM 19-Jan-22